दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
वीर हनुमान मित्रमंडळ आणि समर्थ प्रतिष्ठान दिवा आयोजित भव्य तीन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणांहून ३२ पुरुष संघांनी सहभाग घेतला, तर ४ महिला संघांनीही सहभाग घेतला होता .
पुरुष गट प्रथम क्र वरदानदेवी क्रीडा मंडळ-संगमेश्वर, द्वितीय आई माऊली-रायगड, तृतीय सद्गुरू कृपा-वडाळा, चतुर्थ विजेते प्रियल स्पोर्ट्स-डोंबिवली तर महिला गट विजेते प्रथम विजेते जोत्स्नाताई भोईर गट तर द्वितीय निर्विघ्न स्पोटर्स क्लब, घाटकोपर विजेते ठरले तसेच उतेजनार्थमध्ये उत्कृष्ट पकड, चढाई तसेच लोकप्रिय खेळाडू अशी पुरुष व महिला गटात बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीलेश म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, सौरव सावंत आणि संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहेत. ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी, चरणदास म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, माजी नगरसेवक शैलेश पाटील, माजी नगरसेवक दीपक जाधव, दीपक मुंडे, गणेश मुंडे, सुनीता मुंडे, विनोद मढवी, शशिकांत पाटील, राजण किणे, दिलखुश माळी, सचिन चौबे, उमेश भगत, केशव पाटील, महेश पाटील, संतोष शिर्के आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.