दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई।
दोन मित्र मैत्रीण बाईकवरून फिरत असताना कारवाले सावज हेरून त्यांच्या गाडीला डॅश मारायचे. हे घडल्यावर गाडी थांबवत त्या गाडीचालकाशी भांडण करायचे. त्याचे लक्ष विचलित करून त्याच्याकडील चीजवस्तू चोरून पळून जायचे, हा फंडा राबवणार्या बंटी बबलीला एपीएमसी पोलिसांनी नुकतेच ंगजांआड केले आहे. त्या दोघांनाही पोलिस कोठडीही फर्माविण्यात आली आहे.
सूरज पाटील व अर्चना पवार अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही 21 वर्षीय असून रबाळे येथे राहणारे आहेत. ते दोन दिवसांपूर्वी
दुचाकीवर जात असताना बोनकोडे सिग्नलनजीक एका कारला डॅश मारली. गाडीचालकाने गाडी थांबवून जाब विचारला असता दोघांनी भांडण उकरून काढत त्याचा मोबाइल घेऊन पळ काढला. ही बाब लक्षात आल्यावर गाडीचालकाने थेट एपीएमसी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक तन्वीर शेख यांनी तात्काळ साहाय्यक पोलिस निरीक्षक वसीम शेख, नीलेश शेवाळे, पोलिस हवालदार संदेश म्हात्रे, शशी नलावडे, चंद्रकांत कदम, उल्हास काळे आणि प्रदीप हरड हे पथक परिसरात आरोपींच्या शोधार्थ पाठवले. त्या वेळी तक्रारदाराच्या आरोपी आणि त्यांच्या दुचाकीच्या वर्णनाशी साम्य असलेले जोडपे हे पथक शोधत असताना एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीतच ग्रीन पार्क या इमारतीखाली पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या भाषेत आरोपींशी चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.