• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home एक्सक्ल्यूजिव्ह

सुपांच्या किमतीतही ५० टक्क्यांनी वाढ!

गौराईंच्या स्वागतासाठी ओवशाचा मुहूर्त

प्रतिनीधी by प्रतिनीधी
September 17, 2023
in एक्सक्ल्यूजिव्ह
0
मागणी

मागणी

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी

ठाणे|

गणपती बाप्पा आल्यावर पाठोपाठ गौराईंचे आगमन होते. यंदा ओवशाचा मुहूर्त असल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर सुपांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सुपांच्या किमतीतही ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका सुपाचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. यंदा विदर्भ-मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने बांबूच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. दरवर्षी ठाण्यात जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद, गडचिरोली येथून कारागीर येतात आणि ते दिवसरात्र सुपे बनवण्याच्या कामात व्यस्त असतात.

गणेश चतुर्थीनंतर तिसर्‍या-चौथ्या दिवशी माहेरवाशीण गौराईंची स्थापना केली जाते. वाजत गाजत गौराईंना घरी आणले जाते. गौराईंना साडी नेसवली जाते, नटवले जाते. गौराईंची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातूनच केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते, तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मीची पूजा केली जाते. कोकणातील काही भागांत गौरीपूजनामध्ये ओवसा ही एक परंपरा प्रचलित आहे.

ओवसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे

रायगड जिल्ह्यात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौराई पूर्व नक्षत्रात येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौराईंसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौराई पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत गौराईंना ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत रूढ आहे. यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो.

Tags: आगमनकव्हरस्टोरीकिमतीगणपती बाप्पागौराईठाणे शहरदुष्काळसदृशमराठवाडामागणीमुसळधार पाऊसमुहूर्तलागवडीवाढविदर्भसुप
Previous Post

गणेशोत्सवात उत्सवात कृत्रिम फुलांचीच आरास!

Next Post

उत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा

Next Post
मागणी

उत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा

No Result
View All Result

Recent Posts

  • वागळे आणि धुरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन
  • आम्हाला स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी!
  • उल्हासनगरात वखारमालकांना नोटिस
  • डॉ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार
  • आधारवाडी तुरुंगाच्या सुरक्षेला धोका

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist